spot_img

जेष्ठ साहित्यीक प्रा.पुरुषोत्तम नागपुरे उपाख्य इश्री करंजेकर दादा यांचे निधन

महानुभाव पंथातील साहित्य शिरोमणी निखळला

■जेष्ठ साहित्यीक प्रा.पुरुषोत्तम नागपुरे उपाख्य इश्री करंजेकर दादा यांचे निधन

■मिररवृत्त
■अमरावती

वयाची ब्यान्नवी पार केल्यानंतरही व्रतस्थपणे लेखन, वाचन करणारे महानुभाव पंथाचे जेष्ठ साहित्यिक व संत प्रा.पुरुषोत्तम नागपुरे उपाख्य ईश्री कारंजेकर दादा यांचे १२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा.अमरावती येथे निधन झाले. बुधवार १३ डिसेंबर रोजी त्यांची अंतेष्टी अमरावती येथील गांधीनगर लिहीले निवासस्थानावरुन सकाळी ११ वा. चरित्र केल्या जाणार आहे.
प्रा. पुरुषोत्तम नागपुरे यांच्या निधनाने एका संवेदनशिल
लेखकाला महानुभाव व मराठी साहित्य विश्व मुकले आहे. वर्धा जिल्हयातील खडकी येथील स्वातंत्र्य संग्राम सेनानी चंद्रभानजी नागपुरे श्री यांचे पुत्र म्हणून जन्माला आलेले पुरुषोत्तम नागपुरे हे महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागात ३५ वर्ष करत एमईएस वर्ग १ या पदावरुन पुणे येथुन १९९१ ला सेवानिवृत्त झाले. विविध साहित्य संशोधन व ग्रंथाचे लेखन त्यांनी केले असुन जवळपास ३२ ग्रंथ त्यांनी असुन त्यात प्रामुख्याने लीळा ग्रंथाचा समावेश आहे. स्वातंत्र्यसंग्राम सेवा अभिषेक, प्रभु महानुभावांचे वैदिकत्व, वाद-प्रवाद, संशोधनात्मक वैचारिक लेख,महानुभाव एक आवाहन, प्राचीन मराठी काव्य ग्रंथ ज्ञान प्रबोध, श्री चक्रधरांची सुबोध जीवनगाथा जय चक्रधरा, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त कथा सुर्य उगवला, श्री चक्रधरांच्या भ्रमणांची भौगोलिक माहिती, तिर्थप्रसाद, महाराष्ट्र शासन संपादीत ग्रंथ चक्रधर दर्शन, चरित्र संशोधन लीळा चरित्र कादंबरी पंढरीस संदेश, ऐतिहासीक कादंबरी दरना अशा विविध ग्रंथ, कादंबरी व पुस्तकाची निर्मिती त्यांनी आपल्या लेखनीतून विपूल साहित्य संपदा निर्माण केली.
श्री क्षेत्र रिध्दपूर येथे श्री प्रबोधन संस्था स्थापन केली. महानुभाव या मासीक पत्रिकेचे तथा ओज या साप्ताहिकाचे संपादनही तेच करत. नागपुर विद्यापीठाचे १२ वर्ष सिनेट सदस्य, तर अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठात महानुभाव साहित्य संशोधन केंद्राची स्थापनेत त्यांचा मोठा वाटा होता. अखिल भारतीय महानुभाव साहित्य सेवा मंडळाच्या वतीने देशातील विविध भागात ११ साहित्य संमेलनांचे आयोजन त्यांच्या मार्गदर्शनात यशस्वीरित्या करण्यात आले होते. साहित्य क्षेत्रातील कार्याकरीता त्यांना जीवन गौरव पुरस्कार , अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे सम्मान पत्र, संशोधन साहित्य रत्न पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार, अशा विविध पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला होता.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!